Maharashtra New Expressway : देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला लवकरच एका मोठ्या महामार्गाची भेट मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई सह संपूर्ण राज्यभरात विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही महामार्गांची कामे अजूनही सुरू आहेत. मुंबईत आतापर्यंत अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे झाली आहेत.

मुंबईत कोस्टल रोड प्रकल्प, अटल सेतू प्रकल्प, मेट्रो मार्ग, भुयारी मार्ग, उड्डाणपूल अशा रस्ते विकासाच्या प्रकल्पांच्या कामांमुळे रस्ते अन रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक सक्षम बनली आहे. दरम्यान आता मुंबईहून नागपूरपर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे.

Advertisement

मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून या महामार्गाचे फक्त 76 किलोमीटर लांबीचे काम बाकी आहे.

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा भाग डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. यानंतर शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा 2023 मध्ये सुरू झाला. यानंतर भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा 2024 मध्ये वाहतुकीसाठी सुरू झाला.

Advertisement

आता या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे अर्थातच इगतपुरी ते आमने हे 76 किलोमीटर लांबीचे काम सुरु आहे. या शेवटच्या टप्प्याचे काम देखील 98 टक्के पूर्ण झाले आहे. अर्थातच लवकरच संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाने नागपूरहून इगतपुरी पर्यंतचा प्रवास करता येत आहे. मात्र इगतपुरीच्या पुढे मुंबईकडे जायचे असल्यास मुंबई-नाशिक महामार्गाने प्रवास करावा लागतो. मुंबई-नाशिक महामार्गाने प्रवास करणे मात्र खूपच अवघड झाले आहे.

Advertisement

पण आता इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा म्हणजेच चौथा टप्पा सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच विधानसभा निवडणूकीच्या आधीच संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होणार आहे.

खरंतर समृद्धी महामार्ग हा फक्त ठाण्यातील आमने पर्यंतचं विकसित होत आहे. पण, पुढे हा महामार्ग मुंबई – वडोदरा महामार्गाला जोडला जाणार आहे. या अनुसार आमनेच्या पुढे म्हणजे आमने ते शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी या मार्गाचे काम देखील एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे हे देखील काम सप्टेंबर मध्ये पूर्ण होणार असा दावा होत आहे. सप्टेंबरमध्ये इगतपुरी – आमणे हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आणि आमणे – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी दरम्यानचा जोडणी मार्ग सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार आहेत.

म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्थातच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच नागपुर ते मुंबई अन मुंबई ते नागपूर हा प्रवास आठ तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *