Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मध्य रेल्वे मुंबईहून काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवणार आहे. सणासुदीच्या काळात आणि उन्हाळीच्या सुट्टीमध्ये नेहमीच मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

रेल्वे गाड्यांमध्ये होत असलेली अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रवाशांना विशेष अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान प्रवाशांची हिच अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने आता मध्य रेल्वे मार्गावर काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस दरम्यान आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

त्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. अतिरिक्त गर्दी असतानाही या गाड्यांमुळे प्रवाशांना जलद प्रवास करता येणार आहे.

Advertisement

एलटीटी-बनारस विशेष एक्सप्रेस गाडी

एलटीटी-बनारस विशेष एक्सप्रेस गाडी तीन एप्रिल ते 26 जून दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी दर बुधवारी मुंबई येथून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बारा वाजून 15 मिनिटांनी रवाना होणार आहे.

Advertisement

तसेच बनारस- एलटीटी विशेष गाडी ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत चालवली जाणार आहे. ही ट्रेन दर गुरुवारी बनारस येथून ८.३० वाजता सुटणार अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, वाराणसी इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

Advertisement

लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापुर विशेष गाडी चालवली जाणार 

याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापुर यादरम्यान सुद्धा विशेष गाडी चालवली जाणार आहे. एलटीटी-दानापूर विशेष गाडी एक एप्रिल ते 29 जून पर्यंत चालवली जाणार आहे.

Advertisement

मध्य रेल्वे केलेल्या माहितीनुसार ही ट्रेन सोमवारी आणि शनिवारी १२.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहे. तसेच दानापूर- एलटीटी द्विसाप्ताहिक विशेष गाडी २ एप्रिल ते ३० जूनपर्यंत चालवली जाणार आहे.

ही ट्रेन मंगळवार आणि रविवारी दानापूर येथून ६. १५ वाजता सुटणार अशी माहिती सेंट्रल रेल्वे कडून मिळालेली आहे. या विशेष गाडीला मार्गावरील कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खांडवा इत्यादी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *