Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईहून लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे विभागाकडून ही नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला असून ही नवीन एक्सप्रेस ट्रेन तात्पुरत्या स्वरूपात चालवली जाणार आहे.

म्हणजेच ही ट्रेन कायमस्वरूपी राहणार नाही. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पश्चिम रेल्वे विभागाने मुंबई येथील वांद्रे टर्मिनस-गोरखपूर-डहाणू रोड (द्वि-साप्ताहिक) विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबईहून गोरखपुर कडे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

या आठवड्यातून दोन दिवस चालवल्या जाणाऱ्यां विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण 22 फेऱ्या होणार आहेत. खरंतर, राजधानी मुंबईमध्ये गोरखपुर सहित संपूर्ण उत्तर प्रदेशातील जनता रोजगार निमित्ताने स्थायिक झाली आहे.

यामुळे गोरखपूरहुन मुंबईकडे आणि मुंबईहून गोरखपुर कडे जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दरम्यान मुंबईहून गोरखपुर कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

Advertisement

याचं गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता पश्चिम रेल्वे विभागाने मुंबईहून गोरखपुर ला जाणाऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक नेमके कसे आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे राहणार वांद्रे टर्मिनस-गोरखपूर-डहाणू रोड (द्वि-साप्ताहिक) विशेष एक्सप्रेसचं वेळापत्रक ?

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार वाद्रे टर्मिनस ते गोरखपुर दरम्यान धावणारी विशेष द्वि साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 09043 वांद्रे टर्मिनस येथून आठवड्यातून दोन दिवस सोडली जाणार आहे आहे. ही गाडी 23 जुलै ते 27 ऑगस्ट या कालावधीत चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी मंगळवारी आणि रविवारी मध्य रात्री १२.०५ वाजता सोडली जाणार आहे अन दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ही गाडी गोरखपुर ला पोहोचणार आहे. तसेच गाडी क्रमांक ०९०४४ गोरखपूर-डहाणू रोड ही विशेष एक्सप्रेस ट्रेन गोरखपूरहून 24 जुलै ते 28 ऑगस्ट दरम्यान सोडली जाणार आहे.

Advertisement

या काळात ही गाडी दर बुधवारी आणि सोमवारी दुपारी १ वाजता गोरखपूर येथून सुटणार आहे आणि डहाणू रोडला दुसऱ्या दिवशी रात्री साडेदहा वाजता पोहोचणार आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे मुंबईहून गोरखपुर आणि पुढे गोरखपूरहुन डहाणू रोड कडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *