7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.

खर तर सध्या स्थितीला संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून 2024 ला जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Advertisement

अशा परिस्थितीत, लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत झाल्यानंतर लगेचच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तथा पेन्शनधारकांचा महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. आम्ही सांगू इच्छितो की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून 50% एवढा करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 46 टक्क्यांवरून 50 टक्के एवढा केला जाणार आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू केली जाणार आहे.

या बाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतला जाईल असे म्हटले जात आहे. तसेच, राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे. विशेष म्हणजे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील वाढवले जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

Advertisement

सध्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्ष एवढे आहे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. परिणामी, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे झाले पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

दरम्यान राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर शिंदे सरकार सकारात्मक असून याबाबतचा निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच घेतला जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये होऊ लागला आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले जाणार असे म्हटले जात आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *