India New Expressway : देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाचा मुख्य जोर राहिला आहे. प्रामुख्याने रस्ते विकासाच्या कामाला गेल्या काही वर्षात मोठी गती मिळाली आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांमुळे देशभरात हजारो किलोमीटर लांबीचे नवीन मार्ग  तयार झाले आहेत. अजूनही मोठमोठ्या महामार्गांची कामे केली जात आहेत.

काही मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही मार्गांची कामे सध्या स्थितीला सुरू आहेत. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातही अनेक महामार्गांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यातील काही मार्गांचे काम सुरू झाले आहे तर काही मार्गांचे काम लवकरचं सुरू होणार आहे. सध्या स्थितीला राज्यात समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. हा मार्ग 700 किलोमीटर लांबीचा असून यापैकी 600 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे तयार झालेला सहाशे किलोमीटर लांबीचा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू देखील झाला आहे.

Advertisement

सध्या स्थितीला समृद्धी मार्गाचा नागपूर ते भरवीर हा टप्पा पूर्ण झाला असून भरवीर ते मुंबई हा टप्पा देखील नवीन वर्षात सुरू होण्याची आशा आहे. याशिवाय नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग देखील तयार केला जाणार आहे. तसेच सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग देखील महाराष्ट्रातून जाणार आहे. याशिवाय, इतरही अनेक महामार्गांचे कामे आपल्या राज्यात जोरात सुरू आहेत. दरम्यान आता आपण देशात तयार होणाऱ्या नवीन आठ एक्सप्रेस वे बाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

दिल्ली-मुंबई महामार्ग : देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दरम्यान 1350 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जात आहे. सध्या या मार्गाचे काम सुरू असून या मार्गाचा पहिला टप्पा नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते सुरू करण्यात आला आहे. या मार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास मात्र 12 तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गाचे फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण काम होणार आहे. अर्थातच पुढल्या वर्षी या महामार्गाचा सर्वसामान्यांना लाभ मिळणार आहे.

Advertisement

गंगा एक्सप्रेस वे : उत्तर प्रदेश राज्यात तयार होणारा हा महामार्ग मेरठ आणि प्रयागराज या दोन शहरांना जोडणारा आहे. हा मार्ग जवळपास 594 किलोमीटर लांबीचा राहील. यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवासाचा वेळ सहा तासांवर येईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पूर्वीच सुरू होणार असा दावा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जात आहे.

दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेस वे : दिल्ली अमृतसर कटरा एक्सप्रेस वे जवळपास 650 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या महामार्गामुळे दिल्ली ते कटरा हा प्रवास वेगवान होणार असून यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे. यामुळे दिल्ली पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील धार्मिक ठिकाणे जोडली जाणार आहेत.

Advertisement

अहमदाबाद ढोलेरा एक्सप्रेस वे : गुजरात येथे तयार होणाऱ्या धोलेरा या स्मार्ट सिटीला अहमदाबाद सोबत कनेक्ट करण्यासाठी हा महामार्ग विकसित केला जाणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 109 km एवढी राहणार असून हा मार्ग पुढल्या वर्षी पूर्ण होईल अशी शक्यता आहे. या मार्गामुळे सरदार पटेल रिंग रोड ते ढोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ परस्परांना जोडले जाणार आहे. या मार्गासाठी जवळपास 3196 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये भूसंपादनाचा खर्च पकडलेला नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गुजरात मधील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

बेंगलोर-चेन्नई एक्सप्रेस वे : बेंगलोर आणि चेन्नई एकमेकांना रस्ते मार्गाने थेट जोडण्यासाठी हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग जवळ 260 किलोमीटर लांबीचा राहणार असून यामुळे सध्या स्थितीला दोन्ही शहरांमधील असलेले अंतर 50 किलोमीटरने कमी होणार आहे.

Advertisement

रायपूर विशाखापटनम एक्सप्रेस वे : हा महामार्ग 464 किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी आहे. सद्यस्थितीला या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून वर्ष 2025 मध्ये हा मार्ग बांधून तयार होईल अशी आशा आहे. या मार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा मार्ग तीन राज्यांना जोडतो. छत्तीसगड, ओडिषा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे या तिन्ही राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.

लखनऊ-कानपूर एक्सप्रेस वे : उत्तर प्रदेश मधील लखनऊ आणि कानपूर या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी हा मार्ग विकसित केला जात आहे. लखनऊ आणि कानपूर या दोन्ही शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. हेच कारण आहे की हा 62 किलोमीटर लांबीचा 6 पदरी महामार्ग तयार केला जात आहे. याचे काम 2024 अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. यामुळे लखनऊ ते कानपूर हा प्रवास गतिमान होणार आहे.

Advertisement

गोरखपूर-शामली एक्सप्रेस वे : उत्तर प्रदेश राज्यातील एकात्मिक विकास सुनिश्चित करण्यासाठी या महामार्गाची पायाभरणी करण्यात आली आहे. हा महामार्ग उत्तर प्रदेशमधील आत्तापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा तिसरा महामार्ग राहणार आहे. गोरखपूर ते शामली दरम्यान 700 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी जवळपास 35,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या 700 किलोमीटर लांबीचा रस्त्यामुळे उत्तर प्रदेश राज्यातील रस्ते वाहतुक आणखी सक्षम होणार आहे. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *