Maharashtra News : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा सण गोड करण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सणासुदीच्या काळात एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे.

काल अर्थातच 18 ऑगस्ट 2023 रोजी शिंदे सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यासाठीच्या खर्चास कालच्या मंत्रिमंडळ बैठकीने मान्यता देखील दिली आहे.

Advertisement

गौरी गणपती आणि दिवाळी सणाला शंभर रुपयात आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी शासनाला तब्बल 827 कोटी 35 लाख रुपये इतका अंदाजित खर्च करावा लागणार आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे आता गौरी गणपतीला आणि दिवाळीला शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे.

खरंतर गेल्या दिवाळीला, गुढीपाडवा म्हणजेच मराठी नूतन वर्षाभिनंदन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त देखील हा शिधा वितरित करण्यात आला होता.

Advertisement

दरम्यान आता गौरी गणपतीच्या सणाला आणि येत्या दिवाळीला देखील हा शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. दरम्यान आता आपण याचा लाभ कोणत्या शिधापत्रिका धारकांना होणार आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

100 रुपयात काय काय मिळणार

Advertisement

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल दिले जाणार आहे.

खरंतर सध्याच्या बाजारभावानुसार एवढे जिन्नस खरेदी करण्यासाठी 250 रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. पण शासन सणासुदिच्या पार्श्वभूमीवर केवळ शंभर रुपयात हे जिन्नस नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे. 

Advertisement

कोणाला मिळणाऱ याचा लाभ

याचा लाभ राज्यातील अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना दिला जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील याचा लाभ दिला जाणार आहे.

Advertisement

केव्हा मिळणार लाभ?

याचा लाभ 19 सप्टेंबर रोजी गौरी गणपती सणानिमित्त आणि 12 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त दिला जाणार आहे. निश्चितच शिंदे सरकारने घेतलेले या निर्णयामुळे गोरगरीब जनतेचा गौरी गणपती आणि दिवाळी सण गोड होणार आहे. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *