Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा केंद्रातील मोदी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बुलेट ट्रेनचा हा देशातील पहिलाच प्रकल्प राहणार आहे. यामुळे या प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता देखील आहे. भारतात पहिली बुलेट ट्रेन केव्हा धावणार हा देखील प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन नेमकी केव्हा सुरू होणार आणि या बुलेट ट्रेनने प्रवास करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार ? याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

केव्हा धावणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन रुळावर केव्हा येऊ शकते याविषयी अपडेट दिली आहे. मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे बुलेट ट्रेन 2026 पर्यंत रुळावर येण्याची शक्यता आहे.

Advertisement

या प्रकल्पाबाबत अधिक बोलतांना रेल्वे मंत्री म्हटलेत की, अहमदाबाद कॉरिडॉरसाठी 8 नद्यांवर पुल निर्माणाचे काम आता पूर्ण झाले आहे. या प्रोजेक्टचा एकूण खर्च जवळपास 1.08 लाख कोटी रुपये एवढा आहे.

हा पैसा केंद्र शासन तथा महाराष्ट्र आणि गुजरात राज्य शासन खर्च करणार आहे. केंद्र, महाराष्ट्र तथा गुजरात राज्य शासन जवळपास पंधरा हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. तसेच उर्वरित रक्कम ही जपानकडून कर्ज म्हणून घेतली जाणार आहे.

Advertisement

याला व्याजदर हा फक्त 0.1 टक्के एवढा राहणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली आहे. या प्रकल्पाचे काम 2021मध्ये सुरू झाले होते. म्हणजे या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊन तीन वर्ष झाली आहेत. आता या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

येत्या दोन वर्षात बुलेट ट्रेन प्रत्यक्ष रुळावर धावणार आहे. यामुळे बुलेट ट्रेनने प्रवास करण्यासाठी किती तिकीट लागणार हा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान या संदर्भात रेल्वेमंत्र्यांनी देखील मोठी माहिती दिली आहे.

Advertisement

किती असणार तिकीट दर ? 

बुलेट ट्रेनने प्रवास करण्यासाठी नेमके किती तिकीट दर आकारले जाईल याबाबत तर रेल्वेमंत्र्यांनी माहिती दिली नाही. परंतु त्यांनी बुलेट ट्रेनचे तिकीट हे विमानापेक्षा कमी राहील असे सांगितले आहे. अनेक जाणकार लोक बुलेट ट्रेनचे तिकीट हे विमानापेक्षा महाग राहू शकते असे सांगत होते.

Advertisement

पण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनचे तिकीट दर हे विमानापेक्षा कमी राहणार असल्याचा दावा केला आहे. तथापि, नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक अहवाल समोर आला होता ज्यात मुंबई ते अहमदाबाद असा प्रवास करण्यासाठी जवळपास 3 हजार रुपये इतके तिकीट राहू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

पण, अद्याप याला शासन किंवा प्रशासनाने दुजोरा दिलेला नाहीये. यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट काय राहणार हे जेव्हा बुलेट ट्रेन सुरू होईल तेव्हाच स्पष्ट होऊ शकणार आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *