Property Rights : भारतात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले आहे. कायदेमंडळाने देशात विविध कायदे तयार केले आहेत. संपत्ती विषयक कायदे देखील आपल्या देशात तयार आहेत.

मात्र, संपत्ती विषयक कायदे असतानाही देशातील न्यायमंडळात संपत्तीच्या कारणांवरून होणारे वाद विवादाची लाखों प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे संपत्तीच्या कारणावरून न्यायालयात गेलेले प्रकरण लवकर निकाली निघत नाही.

Advertisement

यामुळे संपत्तीचे खटले वर्षानुवर्ष प्रलंबित असतात. हेच कारण आहे की संपत्तीची वेळेत वाटणी होणे आवश्यक असते. अन्यथा, संपत्तीवरून कुटुंबात वादविवाद होण्याची दाट शक्यता असते.

दरम्यान आज आपण संपत्तीबाबतच्या कायद्यामधील एका महत्त्वाच्या तरतुदी विषयी अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर अनेकांच्या माध्यमातून आजोबांच्या संपत्तीत नातवाचा किती अधिकार असतो याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता.

Advertisement

दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण आजोबांच्या संपत्तीत नातवाचा किती अधिकार असतो हे जाणून घेणार आहोत.

आजोबांची संपत्ती नातवाला मिळणार का ?

Advertisement

भारतीय कायद्यानुसार, जर एखादी व्यक्ती मृत्युपत्र न बनवता मरण पावली, तर केवळ त्याचे तात्काळ कायदेशीर वारस म्हणजे त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनाच त्याच्या स्व-अधिग्रहित मालमत्तेचा वारस हक्क मिळु शकतो.

म्हणजे नातू हा आजोबांच्या संपत्तीत तात्काळ कायदेशीर वारस नसतो. या कायद्यातील एका तरतुदीनुसार मृत व्यक्तीची पत्नी, मुलगे आणि मुली यांना वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाईल आणि त्या मालमत्तेत हिस्सा मागण्याचा अधिकार इतर कोणालाही असणार नाही.

Advertisement

पण आजोबाच्या मृत्यूपूर्वी मुलाचा किंवा मुलींपैकी कोणाचाही मृत्यू झाला असेल, तर मृत मुलाच्या किंवा मुलीच्या कायदेशीर वारसाला तो वाटा मिळेल जो पहिल्या मुलाला किंवा मुलीला मिळणार होता.

यावरून हे स्पष्ट होते की, जर एखाद्या व्यक्तीचे आजोबा मरण पावले तर त्याच्या आजोबांची मालमत्ता प्रथम त्याच्या वडिलांकडे जाईल, त्याच्याकडे नाही. यानंतर त्याला त्याच्या वडिलांकडून त्याचा वाटा मिळेल.

Advertisement

पण, जर एखाद्या व्यक्तीचे वडील त्याच्या आजोबांच्यापूर्वीच मरण पावले, तर त्याला थेट आजोबांच्या मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो. एकंदरीत आजोबाच्या संपत्तीत नातवाचा पिता हयात असेपर्यंत थेट अधिकार नसतो. जेव्हा नातवाचे पिता हयात नसतात तेव्हा त्याला आजोबाच्या संपत्तीत हिस्सा मिळतो.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *