Anandacha Shidha : महा विकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपा यांनी एकत्रित येत युती सरकारची स्थापना केली. सरकार स्थापित केल्यानंतर शिंदे सरकारने अनेक कल्याणकारी आणि जनहिताचे निर्णय घेतले आहेत.

यामध्ये दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, डॉक्टर आंबेडकर जयंती, गौरी-गणपती यांसारख्या महत्त्वाच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील गरीब व गरजू रेशन कार्ड धारक लोकांना या आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत मात्र शंभर रुपयात तेल, साखर, पोहे, दाळ यांसारखे जिन्नस दिले जात आहे.

Advertisement

त्यामुळे गोरगरीब जनतेचा सण गोड होत आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेला गरिबांनी चांगला प्रतिसाद दाखवला असून शासनाची ही योजना सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय बनली आहे.

दरम्यान आगामी वर्षात म्हणजे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत शिवाय राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा देखील बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत, सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी आनंदाचा शिधा ही योजना वर्षभर राबवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Advertisement

शिंदे सरकारकडून याबाबतचे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता अन्न नागरी व पुरवठा विभागाकडून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार केला जात असल्याचे वृत्त एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी जून महिन्यात शिंदे सरकार राज्यातील सत्तेवर विराजमान झालं. सत्ता स्थापित केल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये म्हणजेच दिवाळीच्या काळात शिंदे सरकारने आनंदाचा शिधा ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

रुपयात गोरगरीब जनतेला आनंदाचा शेजाळ मिळाला. यानंतर सरकारने गुढीपाडव्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दिनानिमित्त हा शिधा वितरित केला. यंदा गौरी गणपतीच्या सणाला आणि दिवाळीत देखील हा शिधा देण्यात आला आहे.

आता ही योजना सणासुदीव्यतिरिक्त पण राबवण्याचा निर्णय घेतला जाणार असून ही योजना पुढील एका वर्षासाठी राज्य शासनाकडून राबवली जाऊ शकते असा अंदाज आहे. सध्या याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Advertisement

आनंदाचा शिधा योजना अंतर्गत 315 रुपयांचे जिन्नस फक्त शंभर रुपयात दिले जात आहे. मात्र आता ही योजना पुढील एका वर्षासाठी नियमित सुरु केली तर आनंदाचा शिधा हा मोफत दिला जाईल अशा आशयाचा प्रस्ताव तयार होत असल्याचे सांगितले जात आहे.

निश्चितच जर शासनाने पुढील एका वर्षासाठी आनंदाचा शिधा योजना सणासुदीव्यतिरिक्त देखील राबवण्याचा निर्णय घेतला तर गोरगरीब जनतेला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *