Cotton Market 2023 : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश विभागातील प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यांमधील शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे.

कारण की, दिवाळीनंतर पांढर सोन पुन्हा एकदा चमकल आहे. बाजारात आता तेजी येऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. अशातच आता तज्ञ लोकांनी कापसाच्या भावात आगामी काळात आणखी तेजी येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisement

बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा खरीप हंगामात कमी पाऊस झाला होता. याचा परिणाम म्हणून यंदा कापसाचे उत्पादन घटले आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील जवळपास सर्वच प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये यंदा कमी पावसामुळे उत्पादनात घट येणार आहे.

तामिळनाडूत मात्र यंदा कापसाच्या उत्पादनात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्राचा विचार केला असता आपल्या राज्यात कमी पाऊस आणि गुलाबी बोंड अळीचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात सर्वाधिक घट आली आहे. शेतकऱ्यांना पिकांमधून अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही.

Advertisement

यंदा एकरी उतारा खूपच कमी आला आहे. यामुळे आता कापसाचे भाव वाढू शकतात, असे मत व्यक्त केले जात आहे. दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात कापसाचे भाव एम एस पी अर्थातच हमीभावापेक्षा कमी होते. पण गेल्या काही दिवसांपासून बाजारातील ही परिस्थिती बदलली आहे.

सध्या कापसाचे भाव एमएसपीच्या वर गेले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजारात आलेली ही तेजी पाहता आता शेतकरी गेल्या वर्षी जमा झालेला साठा आणि नुकताच वेचणी झालेला कापूस बाजारात विक्रीसाठी आणू लागले आहेत.

Advertisement

तथापि ज्या शेतकऱ्यांना अजून पैशांची निकड नाहीये त्या शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढतील या आशेने कापसाची साठवणूक केली आहे. यामुळे बाजारात अजूनही मालाची आवक खूपच कमी असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून अजूनही देशातील जिनिंग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. सध्या देशातील फक्त 40% जिनिंग व्यवसाय सुरू आहेत.

दरम्यान, बाजारात कापसाची आवक कमी असल्याने कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वाढत आहे. गुलाबी बोंडअळी आणि हवामानाच्या अनियमिततेमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबईच्या आकडेवारीनुसार, 2022-2023 या आर्थिक वर्षात गुजरातमध्ये 1516000 टन कापसाचे उत्पादन झाले आहे.

Advertisement

तर महाराष्ट्रात पाऊस आणि गुलाबी बोंडअळीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत कापूस उत्पादनात झालेली घट आणि त्याची बाजारातील मागणी लक्षात घेता त्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र बाजार भाव किती वाढणार याबाबत तज्ञ लोकांनी कोणतीच माहिती दिलेली नाही.

काल झालेल्या लिलावात राज्यातील बाजारांमध्ये कापसाला सात हजार 100 ते 7275 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 7050 ते 7225 एवढा नमूद करण्यात आला आहे. तसेच किमान दर सहा हजार ते 7200 एवढे होते.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *