Mumbai To Jalgaon : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते खानदेश नगरी जळगाव यादरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. खरे तर सुवर्णनगरी म्हणून संपूर्ण जगभर ख्यातनाम असलेल्या जळगाव शहरातून शिक्षण, पर्यटन, नोकरी, व्यवसाय अशा विविध कामांसाठी राजधानीत येत असतात.

अनेकांचे मंत्रालयात देखील काम असते. मात्र, सध्या जळगाव नगरीतून मुंबईत जाण्यासाठी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेचाचं पर्याय उपलब्ध आहे.

Advertisement

रेल्वेने प्रवास करायचा झाला तर सुमारे आठ तासांचा प्रवास करावा लागतो आणि ट्रॅव्हल्स प्रवास करायचा झाला तर दहा तासाहून अधिकचा वेळ खर्च करावा लागतोय.

यामुळे मुंबईत येऊन पुन्हा काम आटपून घरी जाणे खूपच अवघड होऊन जाते. रेल्वे आणि ट्रॅव्हल्स प्रवासामुळे नाकी नऊ येतात.

Advertisement

यामुळे अनेकांच्या माध्यमातून या मार्गावर नवीन विमान सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी होती. विमानसेवा सुरु झाल्या नंतर जळगाव ते मुंबई आणि मुंबई ते जळगाव हा प्रवास जलद आणि गतिमान होणार आहे.

दरम्यान खानदेशातील आणि राजधानीतल्या नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद मिळाला असून आता लवकरच मुंबई ते जळगाव दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे.

Advertisement

भारत सरकारच्या अलायन्स या एअरलाइन्स कंपनीकडून ही सेवा पुरवली जाणार आहे. मुंबई ते जळगाव दरम्यान विमानसेवा सुरू करण्यास एअरलाइन्स कंपनीला नुकतीच प्राथमिक स्वरूपाची परवानगी मिळाली आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने ही विमान सेवा सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. मात्र अजून या विमानसेवेला सरकारकडून अंतिम मंजुरी मिळालेली नाहीये.

Advertisement

पण, लवकरच या विमान सेवेला अंतिम मंजुरी मिळेल आणि या मार्गावर जून महिन्यातच विमान सेवा सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

निश्चितच मुंबई ते जळगाव दरम्यान दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विमान सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *