Property Rights : आपल्याकडे लग्नाला एक संस्कार म्हणून ओळखलं जात. भारतीय संस्कृतीत लग्न एका जन्मासाठी नाही तर सात जन्मासाठी असते. एकदा की दोन जीव एकत्र आलेत की त्यांचे नाते ही जन्मोजन्माचे बनते. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन म्हणून ओळखले जाते. लग्नानंतर स्त्रीसाठी तिचे सासर हेच सर्वस्व असते.

लग्नानंतर एक स्त्री आपले आई-वडील, भावंडांना सोडून सासरी नांदायला जात असते. सासरचं घर हे तीच नवीन आयुष्य असत. मात्र असे असले तरी लग्न झाले म्हणजे महिलेला पतीच्या आणि सासरच्या घरात संपूर्ण अधिकार मिळतो का? सासरच्या संपत्तीवर महिलेचा संपूर्ण अधिकार असतो का ? मोठा सवाल आहे.

Advertisement

दरम्यान आज आपण एका विवाहित स्त्रीला पती आणि सासरच्या मालमत्तेवर किती कायदेशीर अधिकार मिळतो, याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतीय उत्तराधिकार कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा आणि मुस्लिम वैयक्तिक कायदा मालमत्तेचा वारसा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मालमत्तेवर कोणाचे कोणते अधिकार आहेत हे या तीन कायद्यांच्या माध्यमातून स्पष्ट होते.

Advertisement

या तिन्ही कायद्यात संपत्तीबाबत अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत. यामध्ये विवाहित स्त्रीला तिच्या सासरच्या संपत्तीवर तसेच तिच्या पतीच्या संपत्तीवर किती अधिकार मिळू शकतो हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. 

विवाहित स्त्रीला तिच्या पतीच्या संपत्तीवर किती अधिकार?

Advertisement

संपत्तीच्या कायद्यानुसार, फक्त लग्न झाले म्हणजे पत्नीला पतीच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार मिळत नाही. पती जिवंत असताना पतीने मिळवलेल्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार नसतो. म्हणजे पतीच्या मृत्यूनंतरच महिलेला मालमत्तेवर अधिकार मिळतात. मात्र इथं देखील एक तरतूद देण्यात आली आहे.

जर पतीने मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र म्हणजे इच्छापत्र तयार केलेले असेल तर त्यानुसार मालमत्तेचे अधिकार ठरवले जातात. म्हणजे इच्छापत्रात जर पतीने पत्नीला संपत्तीवरील अधिकार न देता दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतलेला असेल तर त्या नामनिर्देशित व्यक्तीला पतीच्या संपत्तीवरील अधिकार मिळतात.

Advertisement

जर एखाद्या महिलेचा घटस्फोट झाला असेल अर्थातचं ती तिच्या पतीपासून विभक्त झाली असेल तर तिला तिच्या पतीच्या मालमत्तेत हक्क सांगता येणार नाही.

मात्र तिला पोटगी मिळणार आहे. हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम ८ अन्वये स्त्रीला तिच्या सासरच्या घरात किंवा वडिलोपार्जित मालमत्तेवर जोपर्यंत तिचा पती हयात आहे तोपर्यंत कोणताचं अधिकार नसतो.

Advertisement

तथापि, पतीच्या मृत्यूनंतर, विधवेला तिच्या सासरच्या मालमत्तेत हक्क मिळतो. जेवढा हिस्सा तिच्या पतीला मिळणार होता तेवढा त्या विधवा महिलेला हिस्सा मिळू शकतो.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *