Mumbai Nashik Jalgaon Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी मुंबई, नाशिक, जळगावसह राज्यातील विविध शहरांमधील नागरिकांसाठी खास राहणार आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असून यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्या हाउसफुल होत आहेत. प्रवाशांचा वाढता ओघ पाहता आता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष गाडी चालवणार आहे.

Advertisement

सीएसएमटी ते मऊ यादरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार असून सीएसएमटी ते मऊ अशा दोन फेऱ्या आणि मऊ ते सीएसएमटी अशा दोन फेऱ्या होणार आहेत.

या गाडीचा मुंबई, दादर, ठाणे, कल्याणसह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक, स्टॉपेज आणि गाडीची संरचना कशी राहणार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Advertisement

कसं राहणार उन्हाळी विशेष गाडीचे टाईम टेबल

CSMT ते मऊ ही विशेष गाडी दहा एप्रिल ते एक मे या कालावधीत सीएसएमटी येथून दर बुधवारी 22:35 वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी ही गाडी अकरा वाजून दहा मिनिटांनी मऊ रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

Advertisement

दुसरीकडे मऊ ते सीएसएमटी ही विशेष गाडी 12 एप्रिल ते 3 मे या कालावधीत मऊ रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी 13:10 वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी 00.40 वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

या कालावधीत सीएसएमटी ते मऊ आणि मऊ ते सीएसएमटी अशा प्रत्येकी दोन फेऱ्या नियोजित आहेत. परिणामी या गाडीचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

गाडीची संरचना कशी राहणार

मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे उन्हाळी विशेष गाडी म्हणून चालवली जाणारी ही ट्रेन एकूण 22 डब्यांची राहणार आहे. 22 डब्यांच्या या गाडीमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे.

Advertisement

अतिरिक्त गर्दीत प्रवाशांना या गाडीमुळे दिलासा मिळणार आहे. या गाडीत १८ डबे शयनयान, 2 वातानुकूलित – तृतीय आणि 2 लगेज कम गार्डचे राहतील.

कुठं थांबणार गाडी 

Advertisement

या गाडीला दादर, ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, गोविन्दपुरी, फतेहपुर, प्रयागराज, जंघई, जौनपूर, शाहगंज आणि आजमगड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने दिलेली आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *