Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातून पाऊस जणूकाही गायबच झाल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला यामुळे यंदा देखील चांगला पाऊसमान राहील आणि खरीप हंगामातून चांगली कमाई होईल अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांना होती.

मात्र यंदा निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली नाही. सुरुवातीला पाऊस येण्यास विलंब झाला. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यानंतर जुलै महिन्यात राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली मात्र काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

Advertisement

मात्र या चालू ऑगस्ट महिन्यात अगदी सुरुवातीपासूनच पाऊस गायब झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पण पावसाची तीव्रता खूपच कमी आहे. शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची गरज आहे. परंतु राज्यात कुठेच मोठा पाऊस पडत नाहीये.

भारतीय हवामान विभागाने 25 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबरावं डख यांनी देखील काल 22 ऑगस्ट 2023 रोजी रात्री अकरा वाजता त्यांच्या अधिकृत यूट्यूब चैनल वर 23 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात कसं हवामान राहणारी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Advertisement

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बोरगाव, अंजनगाव सुर्जी, वासिम, रिसोड, पुसद, कळमनुरी, औंढा, जिंतूर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, टेंभुर्णी, हसनाबाद, जाफराबाद, सिल्लोड, माहूर गाव, जळगाव, चाळीसगाव, वैजापूर, धुळे, मालेगाव, अंमळनेर, पाचोरा,कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, अहमदनगर, आष्टी, राहुरी, जालना, संभाजीनगर, मंठा, पाथर्डी, गेवराई, बीड, पाटोदा, करमाळा, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, परंडा, अकलूज, सांगली, म्हसवड, कामठी, लातूर, शिरूर, जळकोट, श्रीगोंदा, उस्मानाबाद, पाथर्डी या गावात व गावापासून 30 किलोमीटरच्या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या संबंधित गावांमध्ये 23 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाब रावांनी व्यक्त केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.

Advertisement

पंजाब रावांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील परभणी, संभाजीनगर, अहमदनगर, जालना, बीड, पंढरपूर, लातूर, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात 23 ते 30 ऑगस्ट पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.

अर्थातच या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच कोकणात रिमझिम पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाचा जोर अधिक राहणार असं पुन्हा एकदा पंजाबरावांनी यावेळी नमूद केल आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *