Soyabean Rate : सोयाबीन हे राजासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप आहे. शेतकरी बांधव याला पिवळं सोनं म्हणून ओळखतात. या पिकातून शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न मिळत असल्याने या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.

पण गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे बळीराजाचे संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सोयाबीन हे पीक उत्पादित होते.

Advertisement

भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. यावरून राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते. दरम्यान, सोयाबीनलाचं गेल्या दोन वर्षांपासून चांगला दर मिळत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.

या चालू हंगामातही मालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. खरीप हंगामामध्ये कमी पाणी आणि हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे अधिकचा खर्च करून सोयाबीनचे पीक जोपासले आहेत. मात्र खर्च अधिक झाला असला तरी देखील उत्पादन खूपच कमी मिळाले आहे.

Advertisement

काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून मात्र दोन ते तीन क्विंटलचा एकरी उतारा मिळाला आहे. शिवाय बाजारात सोयाबीनला अपेक्षित असा भावही मिळत नाहीये. गेल्या आठवड्यापूर्वी बाजारभावात चारशे रुपयांची वाढ झाली होती. यामुळे आगामी काळात आणखी भाव वाढतील अशी आशा होती.

पण झाले याच्या उलट, सोयाबीन दर 4900 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत होता. म्हणजेच बाजार भावात 400 रुपयांची घसरण आले आहे. सोयाबीनला 4600 चा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. अर्थातच सध्याचे भाव हमीभावाच्या आसपासच आहेत.

Advertisement

उत्पादनात घट आणि बाजारभावातील मंदी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे सोयाबीन दरात घसरण कां होत आहे ? हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. म्हणून आता आपण बाजारभावात घसरण होण्यामागे नेमकी कारणे काय आहेत हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

बाजारभावात घसरण होण्याचे कारण

Advertisement

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, दिवाळीनंतर बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या मागणीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. तसेच तांदूळ पेंडच्या निर्यातीवरील बंदीला एका वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

यामुळे सोयाबीनचे भाव वाढले, तर सोयापेंडलाही निर्यात बंदी येऊ शकते अशी भीती असल्याने सोयाबीनचे भाव जाणून-बुजून दबावात ठेवले जात आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने सर्वसामान्यांना स्वस्त दरात खाद्यतेल उपलब्ध व्हावे यासाठी खाद्यतेलावर आयात शुल्क लागू केलेले नाही.

Advertisement

यामुळे परदेशातून मोठय़ा प्रमाणावर खाद्यतेल आपल्या देशात आयात होत आहे. देशात आफ्रिकेतील खाद्यतेल मोठय़ा प्रमाणात दाखल होत आहे. म्हणून देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव वाढत नाहीये. यामुळे सोयाबीनचे दर दबावात असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *