Wheat Farming : येत्या काही दिवसात राज्यात गहू पेरणीला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात शेतकरी बांधव गव्हाची पेरणी करणार आहेत. काही शेतकरी बांधव उशिराने गव्हाची पेरणी करतात. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत गव्हाची उशिराने पेरणी केली जाते.

कृषी तज्ञ मात्र शेतकऱ्यांना 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये असा सल्ला देतात. खरंतर गहू हे एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातील बहुतांशी भागात पेरणी केली जाते.

Advertisement

याही हंगामात मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी होणार आहे. अशा स्थितीत आज आम्ही शेतकऱ्यांसाठी गव्हाला कधी, कसं व किती पाणी दिले पाहिजे? गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे केले पाहिजे याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

जमिनीच्या पोतनुसार गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन

Advertisement

जर भारी जमिनीत गव्हाची पेरणी केलेली असेल तर 18 दिवसाच्या अंतराने सहा पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत.

तसेच जर शेतकऱ्यांनी मध्यम जमिनीत गव्हाची पेरणी केलेली असेल तर पंधरा दिवसांच्या अंतराने सात पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत.

Advertisement

याशिवाय हलक्या जमिनीत जर गव्हाची पेरणी केलेली असेल तर शेतकरी बांधवांनी 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आठ ते दहा पाण्याच्या पाळ्या गहू पिकाला देणे आवश्यक आहे.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन

Advertisement

जर शेतकऱ्यांनी कोरडवाहू भागात गहू पेरणी केली आणि पिकाला एकच पाणी देण्यासाठी पाण्याचा साठा उपलब्ध असेल तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसात पाणी द्यायचे आहे. जर समजा पिकाला दोन पाणी देण्याइतके पाणी असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी दिले पाहिजे.

तसेच जर एखाद्या शेतकऱ्याकडे पिकाला तीन पाणी देन्याइतके पाणी असेल तर त्यांनी पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी पेरणीनंतर 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी दिले पाहिजे.

Advertisement

या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नका

कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, शेतकरी बांधवांनी गहू पिकाला मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 21 दिवसाच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच फुटवे फुटण्याचा अवस्थेत म्हणजे 40 ते 42 दिवसात पाण्याचा ताण पडू देऊ नये.

Advertisement

ओंबीवर येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलोरा अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर 70 ते 80 दिवसांनी पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच दाण्यात चीक भरण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 90 ते 100 दिवसांनी पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *